समज गैरसमज चंद्रग्रहण व सुर्यग्रहण
बर्याच रुग्नाचे आग्रहापर ...लेख:-
#सुर्यग्रहण वा #चंद्रग्रहण व #गर्भवती_स्त्री(भाग3)
सुर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण...ह्याचा गर्भवतीस्त्रीवर परिणाम होतो का? तर ह्याबाबत अशा केसे स एेकीवात नाही..परंतु ग्रंथामध्ये वा हिंदु धर्मामध्ये आघ्यायिका आहे..की त्याकाळी गर्भवती स्री ने बाहेर पडु नये ,शस्त्रे,लोखड वा काही सुई वैगेर घेवु नये,तसेच ग्रहणाच्या अगोदर जेवुन घ्यावे,त्या काळात झोपु नये तसेच अगोदर व नंतर अंघोळ करावी..परंतु
संशोधनात्मक विचार केला तर पौर्णिमा व अमावस्याला ज्या प्रमाने साागराला भरती येते त्याचप्रमाने गर्भवती स्त्रीच्या पोटातील गर्भोदकाचे प्रेशर वाढते व प्रसव कळा सुरु होतात..हे बर्याच वेळा दिसुन येते..त्याचप्रमाने पोर्णिमा व अमावस्येचा परिणाम हा अपस्मार व उन्मादाच्या रुग्नामध्ये ही होतो..त्यांच्या सुषुम्नाजलाचे प्रेशर वाढते व त्यांना अपस्माराचे झटके येतात..
त्याचप्रमाने ग्रहनामध्ये ज्यावेळी चंद्रावरील वा सुर्यावरील छाया निघुन जाते तेव्हा काही काळ अतिप्रखर किरने प्रुथ्वीवर पडतात त्याचा परिणाम हा गर्भवतीवरच नाही तर जलमहाभुत ,रक्त धातु व पित्त दोष ह्यावरही होतांना दिसेल.
.पुर्वीच्या काळी आजप्रमाने बिल्डीग,गर्दी तसेच राहण्यासाठीचे सिमेंटची घरे,डोऴ्यात घालायला चष्मा तसेच विजेचा शोध लागला नसल्याने अन्न वैगेरे हेही घराबाहेरच बनवत असत त्याचप्रमाणे सिंमेटची घरे नसल्याने सुर्याच्या किरनांचा प्रत्यक्ष संबध शरीराशी येत असत..,.त्यामुळे त्याकाळी हा परिणाम दिसत असेल त्यामुळे त्यांनी उल्लेख केला असावा..परंतु
आजही जसा समुद्रावर परिनाम होतो तसाच गर्भवतीवरही होवु शकतो जर ती त्या किरनाच्या प्रत्यक्ष संपर्कात गेली तर..
त्याकाळात घरात राहावे वा ओफिस मध्ये राहावे..आज प्रत्येक ठिकाणी आडोसा वा छत्र आहे मग ते रेल्वे प्लेटफोर्म असो व बस स्टोप वा बस असो वा ट्रेन ..त्यामुळे गर्भवती स्त्रीयांनी फार काऴजी करु नये,तसेच त्याकाळी काय खावे व नाही ह्याचेही बंधने नाही..कारण तसे असते तर तसा केसेस पुढे आल्या असत्या..
८ व्या ते ९ महिन्याच्या स्रीयांनी काळजीसाठी घरात रहावे हे सोयीस्कर..
कारण गर्भोदकाची मात्रा जास्त असते त्यामुऴे त्यावर परिनाम होवु नये म्हणुन..हा एक संशोधनाचा विषय आहे..व बर्याच गोष्टी एेकीवात असतात..
परंतु धर्मग्रँथात लिहलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये विद्न्यान लपलेले असते..ते ओळखता व संशोधन करने गरजेचे आहे..त्यामुऴे ग्रहणाची काऴजी घ्यावी...
ग्रंथातही उल्लेख आहे की पोर्णिमेचा परिनाम जलावर कसा होतो..
चंद्राच्या गुणांचा विचार केला तर शितलता हे प्रमुख गुण आहे..तसेच ग्रंथातही चंद्राच्या प्रकाशातील सिध्दजल वा दुध शित गुण य़ुक्त असते असे वर्णन केलेले आहेत..
ससितंमाहिषं क्षीरं चन्द्रनक्षत्रशीतलम्..!!अ.ह्र ३/३२
तसेच,
नक्षत्रांचा,सुर्याचा , चंद्राचा तसेच नक्षत्रांचा प्रुथ्वीवरील जलावर परिणाम होतो..म्हणजे जसे पोर्णिमेला सागराच्या पाण्याने भरती येते तसेच गर्भिणीला बर्याच वेळेला त्रास होतांना दिसताो म्हणजे त्यांच्यातील AMNIOTIC FLUID चे दबाव वाढतो..
त्यामुळे जास्त प्रसुती ही पोर्णिमेच्या दिवशी होतांना दिसते..
तसेच उन्माद व अपस्मार रुग्नांमध्ये चेष्ठा वा फिटस् येतांना दिसते..म्हणजे पुर्ण चंद्राचा परिणाम जल ,तेज व प्रुथ्वी महाभुतावर दिसतो ...ह्यात सर्वच स्री पुरुषांमध्ये हा फरक दिसतो च असे नाही..
हे लक्षात घ्या..
जे व्यक्ती अल्पसत्वी,घाबरट,भित्रे आहे..थोड्याशा अडचणीने ते गोंधळतात..तसेच जास्त Hypertonic आहेत , त्या व्यक्तींमध्ये ह्यांचा परिणाम म्हणजे ग्रहणाचा परिणाम होतांना दिसतो..त्यामुळे ग्रहण काऴात मंत्रपठण सांगीतले आहे कारण #मनोदेवता श्रेष्ठ देवता...!! मनावर चांगल्या ,सकारात्मक गोष्टींचे पठण केल्याने आत्मविश्वास वाढतो व मनाद्वारे सकारात्मक विचार व कर्म केले जाते...त्यामुळेच पठण वैगेरे सांगीतले आहे..परमेश्वर आपल्या मनातच आहे..त्यालाच सकारात्मक विचाराने घडवणे आवश्यक आहे....
तसेच प्रखर किरणाचा प्रभाव धातु व शस्त्रांवर दिसुन येत असे..आता तेही उघड्यावर कोनी ठेवत नाही त्यामुळे त्यांचाही परिणाम दिसुन येत नाही..
परंतु तरीही गर्भिनीने चौथ्या महिनापासुन ते नवव्या महिनापर्यत ग्रहण काऴात विशेषत मोक्ष काळात उघड्या डोऴ्यांनी ग्रहण पाहु नये...
पुर्वी सुतिकाअवस्थेत सुतिकाग्रुहात पाण्याचे घडे चारही दिशांना भरुन ठेवत व रोज ते पाणी बदलत असे कारण ग्रहणाचा वा नक्षत्रांचा परिणाम त्या जलांवर होवो त्यानुसार ते जल फेकले जात...आज बंद घरात हे परिणाम ही दिसुन येत नाही...
ग्रंथात..
तप्तं तप्तांशुकिरणै: शीतं शीतांशुरश्मिभि: !
समन्तादप्यहोरात्रमगस्त्योदयनिर्विषम् !शुचि हंसोदक नाम....!!३/५१
शरदात दिवसास चोहोंकडुन सुर्यकिरनांनी संतप्त झाल्यानंतर व रात्री चंद्रकिरनांनी शीत झाल्यामुळे व अगस्ती नक्षत्रांच्या उदयाने विषरहित झाल्यामुळे पाणी निर्मल व शुध्द होते त्यास हंसोदक म्हणतात..
तसेच
ग्रंथामध्ये बर्याच ठिकाणी भुत ,ग्रह म्हणुऩ वर्णन केले आहे ह्याचा अर्थाचा संशोधन केल्यास असे समजते की ज्या गोष्टीमुळे शरीरावर दुष्टी होते..त्रिदोषांमध्ये बदल निर्माण होतो परंतु ते कारण उघड्या डोऴ्यांनी दिसत नाही त्यास आपन Viral or Bacterial infections म्हणु शकतो जे डोऴ्यांनी दिसत नाही..जसे..काही Infection मुळे मेंदुवर व CSF ( सुषुम्नाजलावर परिनाम होतो) त्यामुळे त्याचा दबाव वाढल्याने रुग्न विचेष्टा व क्रुती करतो..
हा प्रभाव काही नक्षत्रामध्ये तसाच पौर्णिमा व अमावस्येमध्येही दिसुन आला होतो त्यामुळे ग्रंथकारांनी नक्षत्रावरुन त्या आजाराला नाव दिले...म्हणजेच नक्षत्रांचा मनुष्य शरीरावर परिणाम हा होतो तो विशेषत ..ही संशोधनात्मक बाब आहे..
तसाच परिणाम हा उन्माद (वेडेपना) व अपस्मार ( Fits येने) ह्या रुग्नावर ही पोर्णिमा व अमावस्येला होतो..
चंद्र असेल वा नक्षत्र असतील तर त्याच्या अति शितलतेचा हा जलमहाभुतावर परिणाम होतो व तो ताकदीने होतो की त्यात गुरुत्वाकर्षण व आकर्षण दोन्ही दिसुन येते ते काही काळा पुरते जास्त प्रमानात दिसते.
हेच उन्मादाच्या रुग्नामध्ये वा वातपित्तज रुग्नामध्ये वा HYPERTONIC रुग्नामध्ये छातीत धडधड वा बैचेनी ह्या स्वरुपात काही कालावधीसाठी पाहायला मिळते..ह्यावर संशोधन होने गरजेचे आहे..
ग्रहण लागल्यानंतर वातावरनात बदल निर्माण होतो ,साधे सुर्याभोवती ढग जरी जमा झाले तरी वातावरण दमट होते व वायरस व बेक्टिरियांची पैदास होन्यास मदत होते त्यामुळे उपवास वैगेर काही करु नये जेणे करुन आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होईल...
बाहेर फिरु नये वा प्रत्यक्ष संपर्कात येवु नये..त्याकाऴात वातावरणातही बदल होतो त्यामुऴे गर्भवतीने टाळावे..
तसेच आपण ज्या धर्मांचे असाल त्या धर्मातील मंत्र,चांगली वचने तसेच ग्रंथ वाचन करुन मनावरील ताण कमी करावा..कारण अगोदर सांगीतल्याप्रमाने मनोदेवता श्रेष्ठ देवता....!!!
श्रध्दा ...सबुरी..व अभ्यास....!!!
वैद्य.सचिन मारुती भोर
श्री साईनाथ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर
रावेत,पुणे.
9284147296
Shreesainathayurveda.in
Comments
Post a Comment